रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

(स्वतःचे काम )

(कथा क्र.119)

मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता. एके दिवशी शेतकरी शेतात आला. तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की, ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’ शेतकर्‍यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली, ‘आई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’ आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’ दुसर्‍या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्‍यांना बोलावीन. तिसर्‍या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’ हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले, ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्‍याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.’

तात्पर्य- आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल हि अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे 

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा