सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

महाराजा सत्यशील

कथा क्र.134

विजयगडचा राजा सत्यशील याला आपल्या उत्तराधिका-याचा शोध होता. मंत्र्याशी चर्चा केल्यावर त्याने म्हंटले,"आपले ४ पुत्र दयाशील, धर्मशील, कर्मशील आणि विवेकशील हे आहेत ना! मग आपण चिंता का करता?" राजा म्हटले," आमच्या कुळात केवळ योग्यतेनुसार राजा निवडला जातो." तेंव्हा मंत्र्याने त्याची योग्यता पारखण्याचा आग्रह केला राजाला ती गोष्ट योग्य वाटली. त्याने आपल्या चारही मुलांना अशा गावात पाठविले जिथे लोक दरोडेखोरांपासून त्रस्त होते. चौघेही तेथे गेले. विवेकशील सोडून इतर तिघेही गावातील मुख्य व्यक्तीच्या घरी थांबले. दयाशील गावात फिरायला निघाला तेंव्हा त्याने गावात दरोडेखोरांनी केलेली गावाची दुर्दशा पाहून त्याला दुःख झाले. त्याने त्या मुख्य व्यक्तीला बोलावून एका घरात आश्रम बनविला व सर्व त्रस्त लोकांना बोलावून त्यांची तेथे सेवा करू लागला. एके दिवशी दरोडेखोरांनी तो आश्रमही नष्ट करून टाकला. तेंव्हा तेथील लोकांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धैर्यशील याने त्या लोकांना धैर्याने थांबविले आणि तो आश्रम पुन्हा बांधला. एके रात्री परत दरोडेखोर आले तेंव्हा कर्मशीलच्या नेतृत्वाखाली लोक दरोडेखोरांशी लढले आणि दरोडेखोरांना पळवून लावले. त्या मुख्य व्यक्तीने आता हि शुभ वार्ता महाराजांना कळवण्याचा राजकुमारांकडे आग्रह धरला पण विवेकशील याचा कुठेच पत्ता नव्हता. तितक्यात विवेकशील तेथे आला आणि म्हणाला,"माझा उद्देश समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा होता.दरोडेखोराच्या आईवडिलांची हत्या मुख्य व्यक्तीने केली होती त्याचा बदला हे दरोडेखोर या गावाशी घेत होते. चूक त्यांची नाही तर मुख्य व्यक्तीची आहे. त्याला आधी तुरुंगात टाका." राजाने तशीच कारवाई केली व विवेकशील यालाच वारस नेमले. 

तात्पर्य-विवेक सदगुणाच्या उपयोगाचे ज्ञान देत आहे. ते अन्य गुणांपेक्षा श्रेष्ठ आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा