शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

स्‍वामी श्रद्धानंद

कथा क्र.158 

घटना 1919 ची आहे. इंग्रजाविरोधात संपूर्ण दिल्‍ली बंदची घोषणा करण्‍यात आली होती. लोक घरांच्‍या आत होते आणि रस्‍ते मोकळे पडले. पोलीसांची गाडी चोहीकडे फिरत होती आणि कुठे एखदे दुकान उघडे तर नाही ना याचा तपास करीत होती. संपूर्ण बाजार बंद होता परंतु एका ठेकेदाराने आपले कार्यालय उघडे ठेवले होते. पोलीसांनी त्‍याला ते बंद करण्‍याचा आदेश दिला. मात्र त्‍याने तो पाळला नाही. त्‍यामुळे जास्‍तच वादविवाद झाला आणि पोलीसांनी दोन स्‍वयंसेवकांना पकडले. या धरपकडीमुळे जनतेत क्रोधाची लाट पसरली. बघता बघता 20 हजार लोक चांदणी चौकात एकत्र जमा झाले. तेव्‍हा तेथे स्‍वामी श्रद्धानंद आले आणि त्‍यांनी परिस्थिती आटोक्‍यात आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले. त्‍यांनी त्‍या जनसमुदायाला शांत करण्‍यासाठी भाषण केले. त्‍यामुळे जनसमुदायात सकारात्‍मक ऊर्जा निर्माण झाली. जेव्‍हा स्‍वामीजी परत येऊ लागले तेव्‍हा चांदणी चौकात गोळी झाडली गेली. त्‍यामुळे जनतेचा राग अनावर झाला. स्‍वामींनी पुन्‍हा जनतेला शांत केले व पोलीसांना विचारले,''तुम्‍ही गोळी का चालवली?'' पोलीसांनी त्‍यांच्‍यावर बंदूक रोखली व म्‍हटले,''बाजूला व्‍हा, नाहीतर तुमच्‍यावरच गोळी झाडू'' हे ऐकताच स्‍वामीजी पुढे झाले व त्‍या पोलीसासमोर जाऊन उभे राहून मोठ्या आवाजात म्‍हणाले,''मारा गोळी, मरणाला आम्‍ही भीत नाही'' हे त्‍यांचे धाडस पाहून एक इंग्रज अधिकारी पुढे आला म्‍हणाला,''गोळी चुकून चालली'' स्‍वामीजी जनतेला घेऊन शांततेने पुढे सरकले.

तात्‍पर्य :- जनताही त्‍यालाच नेता मानते जो प्रत्‍येक क्षण त्‍यांच्‍यासाठी त्‍याग करण्‍यास तयार असतो. नेता हा धाडसी व आत्‍मविश्‍वासाने भरलेला तसेच स्‍वच्‍छ चारित्र्याचा असावा अशी जनतेची अपेक्षा असते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा