बुधवार, १३ मार्च, २०१३

(यक्ष आणि यक्षिणी)


 (कथा क्र. ४४)

एका चंदन व्यापाऱ्याला २ मुले होती. एकदा व्यापाऱ्याने व्यापाराच्या निमित्ताने दोघांना अरब देशात पाठवले, दोघेही जहाजाने गेले. दुर्दैवाने वादळात अडकल्याने जहाज भरकटले आणि दोघेही भाऊ एका बेटावर आले. तेथे एका यक्षिणीची भेट झाली. ती अत्यंत सुंदर होती. यक्षिणीने तिचा सुंदर असा महाल पाहण्यास त्यांना नेले. तेथे गेल्यावर त्यांचा दोघांचा सत्कार केला. दोघेही खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी ते बेटावर फिरायला निघाले, तेंव्हा एका व्यापाऱ्याला गंभीर अवस्थेत पहिले, त्याला विचारल्यावर त्याचेही जहाज भरकटल्याचे त्याने सांगितले, येथे एका यक्षिणीने त्याचे स्वागत केले, परंतु एका गोष्टीवरून नाराज होवून तिने त्याचे हाल केले. व्यापाऱ्याने पुढे सांगितले, एका निश्चित तिथीला येथे एक यक्ष घोड्याचे रूप धारण करून येतो आणि प्रार्थना केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे नेवून सोडतो परंतु त्या घोड्यावर सवार झालेल्या व्यक्तीने मागे पळत येणाऱ्या यक्षिणीकडे वळून पाहिल्यानंतर तो यक्ष त्या व्यक्तीला समुद्रात फेकून देतो. दोन्ही भावांनीहि त्या यक्षाला समुद्राच्या पलीकडे नेवून सोडण्याची विनंती केली. यक्षाने ती मान्य केली. दोघेही यक्ष बरोबर घोड्यावर स्वार झाले. त्याबरोबर मागे थांबण्यासाठी आवाज दिला. लहान भाऊ स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने मागे वळून यक्षिणीकडे पाहिले त्याबरोबर यक्षाने त्याला समुद्रात फेकून दिले. त्याक्षणी यक्ष म्हणाला , हे मूर्ख मनुष्या!तू स्वत:वर नियंत्रण न केल्याने तुला मृत्यू हा स्वीकारावा लागेल." लहान भावाने ऐकले पण खूप उशीर झाला होता. खोल समुद्रात बुडून तो मरण पावला.

तात्पर्य- एखादी गोष्टीचे दुष्परिणाम माहित असताना सुद्धा जर मानवाने स्व: नियंत्रण केले नाही त्याचे फळ भोगावे लागते.

वर्तमानपत्रातून संग्रहित



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा