शुक्रवार, २२ मार्च, २०१३

(पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा)


(कथा क्र. ४७)

एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती-पत्नीव्यतीरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत नसत. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्यांनी खूप उपचार केले. पण तो ठीक झाला नाही. त्याचवेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले, त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले कि ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल. पती गावाला निघून गेला. दुर्दैवाने तो जाताच मुलगा मरण पावला. पत्नीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येण्याच्या वेळेत स्वयंपाक करू लागली, पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे. तुम्ही आधी जेवण करून घ्या. त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला. तेव्हा पत्नी म्हणाली, "शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले, आता जेंव्हा मी माझे भांडे मागत आहे, तेंव्हा ती माझ्यावरच चिडत आहे. भांडत आहे व भांडे माझेच म्हणून हट्ट धरून रडत बसली आहे." पती म्हणाला,"मूर्ख बाई आहे ती ! दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का?" तोपर्यंत पतीचे भोजन झाले होते. तेंव्हा पत्नी म्हणाली, "आपला मुलगा हे पण ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे. मग आपणही शेजारणी सारखे रडत बसायचे का?" पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळा मामला समजून आला, तो म्हणाला,तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाचे पुढील अंतिम संस्कार मोठ्या धैर्याने पूर्ण केले.

तात्पर्य- मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा