गुरुवार, १३ जून, २०१३

(भिक्षु आणि राजा)

(कथा क्र.९) 

एक राजा नेहमी उदास राहायचा. लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे. त्याच्या नगरात एक भिक्षु आला भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिक्षूला विचारले." मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांतता मिळत नाही. मी काय करायला हवे?" भिक्षु म्हणाले,"आपण एकांतात बसून चिंतन करा." राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला. तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाई साठी तिकडे आला. राजाशी तो चर्चा करू लागला. कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली. ती ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दु:ख जाणून घेतले. सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजले कि कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत. राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी राजाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षुशी भेट झाली. तेंव्हा भिक्षूने विचारले," राजन! आपल्‍याला काही शांतता मिळाली का?’’ राजा म्‍हणाला,’’ मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्‍हापासून मी मनुष्‍याच्‍या दु:खाचे स्‍वरूप जाणले तेव्‍हापासून अशांतता थोडी थोडी कमी होत आहे.’’ तेव्‍हा भिक्षुने समजावले,’’ राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे. बस्‍स, त्‍या मार्गाने पुढे जा, एक राजा तेव्‍हाच प्रसन्‍न राहू शकतो जेव्‍हा त्‍याची प्रजा सुखी असेल.’’

तात्‍पर्य – दुस-याचे दु:ख समजून घेण्‍यातच खरी शांतता लाभते. दुस-याच्‍या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दु:खातही सहभागी व्‍हावे. त्‍याचे दु:ख कमी करता आले तर आपल्‍या मनाला शांतता मिळते. सहकार्य महत्‍वाचे आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा