रविवार, २ जून, २०१३

(सुरक्षितता)

 (कथा क्र. ८८) 


एकदा एका हरणाचा एक डोळा निकामी झाला. मग त्याला युक्ती सुचली. त्याने समुद्राच्या काठी फिरायला सुरुवात केली. त्याला वाटले आपल्याला धोका आहे तो जमिनी कडूनच कारण कोणताच शिकारी समुद्रातून येणारच नाही. एक डोळा जमिनीकडे लावून आपल्याला आपल्या अन्नाची सोय करता येईल. एक शिकारी बरेच दिवस त्या हरीणाकडे लक्ष ठेवून होता. बरेच दिवस तो त्याला मारण्यासाठी टपून होता पण ते हरीण काही त्याच्या तावडीत सापडत नव्हते. त्याची शिकार काही त्याला होत नव्हती. जमिनीच्या बाजूने जेंव्हा शिकारीची वेळ येई तेंव्हा हरीण पळून जात असे. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक दिवस एक नाव घेतली व समुद्रामध्ये सकाळपासून फिरत राहिला. अचानक संध्याकाळच्या वेळी त्याने हरणावर गोळी झाडली. नेम अचूक लागला. हरणाला गोळी लागल्यावर हरीण मरणोन्मुख झाले. मरता मरता ते स्वतःशीच म्हणाले,"ज्या डोळ्याने मला दिसत नव्हते तोच डोळा मी समुद्राकडे ठेवून फिरत राहिलो. पण समुद्राच्या बाजूनेच माझा घात झाला. मला समुद्राच्या बाजूची खात्री होती पण त्या बाजूनेच मला मरणाच्या दारात पोचविले."

तात्पर्य-आपल्या जिथे सुरक्षितता वाटते तिथूनच काही वेळा धोका होऊ शकतो. सुरक्षितता/सावधानता हि सदैव बाळगली पाहिजे. सर्वच बाबतीत ! खरेय ना !!

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा