गुरुवार, ३० मे, २०१३

(रामप्रसाद बिस्मिल)

(कथा क्र ८५) 

थोर क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांना काकोरी प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या दोन दिवस आधी बिस्मिल यांची आई त्यांना भेटायला कारागृहात आली. जेंव्हा बिस्मिल यांना आईसमोर आणण्यात आले तेंव्हा अचानक या क्रांतिकारकाच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांच्या मनात आईबाबत अनेक सुखद आठवणी जाग्या झाल्या. आईचे प्रेम आणि वात्सल्य आठवत बिस्मिल यांचे मन भरून आले. बिस्मिल यांना रडताना पाहून त्यांची आई मनातल्या मनात काय समजायचे ते समजून गेली. पण या परिस्थितीत आपला मुलगा कमजोर बनवू इच्छित नव्हती. त्यामुळे स्वतः:च्या भावनांवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली," मला तर वाटत होते कि तू स्वतःच्या भावनांवर विजय मिळवला आहेस. पण इथे तर वेगळेच चित्र दिसत आहे.जीवनभर देशासाठी लढून तू आता माझ्यासाठी अश्रू ढाळत आहेस का? हा कमकुवतपणा ठीक नाही. तू वीराप्रमाणे फासावर चढलास तर मी स्वतःला धन्य समजेन. मला अभिमान आहे कि माझा मुलगा देशाच्या हितासाठी बलिदान देत आहे. माझे काम तुला मोठे करणे होते.त्यानंतर तू देशाचा होतास आणि देशहितासाठी तू कामाला आलास याचा मला आनंद वाटतो. मला याचे जराही दु:ख होत नाही. मग तू का रडतो?" आईचे म्हणणे ऐकून रामप्रसाद यांनी अश्रूवर नियंत्रण मिळवले आणि ते आईला म्हणाले,"आई! मला माझ्या मृत्यूवर जराही दु:ख नाही. विश्वास ठेव मी माझ्या मरणावर संतुष्ट आहे." फाशीवर चढताना रामप्रसाद बिस्मिल यांचे शब्द होते.


"मालिक, तेरी रजा रहे और तू हि तू रहे ,
 बाकी मै रहु न रहु मेरी आरजू रहे, 
जब तक कि तन में जान, 
रगो लहू रहे तेराही जिक्र या तेरी जुस्तजु "

तात्पर्य-बलिदान महान आदर्श आहे. तो आचरणात आणणारा इतिहासात अमर होवून जातो.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा